Friday, July 10, 2020

वेगवशता ऑनलाईन टेस्ट

*╔═══❖•ೋ°☬°ೋ•❖═══╗*
         *ऑनलाईन टेस्ट सिरीज 14*
*╚═══❖•ೋ°☬°ೋ•❖═══╝*
    
      *सुधारित अभ्यासक्रमानुसार*

      *इयत्ता बारावी*        *विषय मराठी*
            
           🖋️ *_चाचणी क्रं.१४_* 🖋️
            
     📖 *कथा-साहित्यप्रकार-परिचय*📖
                          *१) शोध*
       
                        ( *भाग ३* )

     👇 *_लिंकला स्पर्श करा_* .👇
  *आपले नाव टाका....चाचणीत सहभागी व्हा* 


👉http://testmoz.com/4310148  👈

                
                🙏 *निर्मिती* 🙏
     
                 *प्रा. श्रीनिवास राठोड*
    *जेमला नाईक ज्यु.काँलेज सकनुर तांडा* 
                       *मुखेड जि.नांदेड* 
        📱 7249129999

         ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

Thursday, July 9, 2020

रोज मातीत


           २) रोज मातीत
                             *कल्पना दुधाळ* 

                      *कवयित्री परिचयः*
कल्पना दुधाळ यांचा जन्म 12 ऑक्टोंबर 1978 रोजी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या गावी झाला.
 बालपण शेतीत कष्ट करता करता गेलं . अन् विवाह झाला तो ही शेतकरी कुटुंबात , त्यामुळे मातीशी एक अनामिक नातं त्यांचं तयार झाल . घर आणि शेती यांतील कष्टप्रद अनुभवातून त्यांची कविता स्त्रीवेदना प्रकट करत राहते , तशी प्रतिमा , प्रतीके त्यांच्या कवितेतून येत राहतात , गेल्या दहा वर्षात त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले . " सिझर कर म्हणतेय माती ' , ' धग असतेच आसपास ' या दोन्ही कवितासंग्रहातील कविता अस्सल जीवनभान व्यक्त करणाऱ्या आहेत . त्यांच्या कवितांत भोवतालची माणसं,निसर्ग , गुरं ढोरं , पशु - पक्षी , शेतीभाती , आजूबाजूचं वातावरण  या सर्व घटकांना समावून घेणारी कविता कल्पना दुधाळ यांची आहे . ' सिझर कर म्हणतेय माती ' या काव्यसंग्रहाला ' कवी कुसुमाग्रज ' पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत . ' धग असतेच आसपास ' साठी ' महाराष्ट्र फाऊंडेशन ' चा ललित गंथ पुरस्कार मिळाला आहे . 

 *कवितेची मध्यवती कल्पना* 

शेतकरी हा समाजजीवनाचा पाया आहे . भारत हा कृषिप्रधान देश आहे . शेतकऱ्याला साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीचे कष्टही मोलाचे असतात . बाई कोणतंही काम हाताशी घेते तेव्हा ते मनापासून करण्याचा तिचा प्रयत्न असतो . मातीत पेरलेलं बीसुद्धा ती मायेने वाढवते , त्याला पाणी घालते , आपली धरतीमाय हिरवी व्हावी , शेत फुलावं यासाठी अपार कष्ट करते , घर , शेत या दोन्ही ठिकाणी कष्ट करून आपला संसार फुलवताना तिचे कष्ट दुर्लक्षिले जातात , त्याबद्दलचं दुःखही तिला नाही . पण त्याबाबतचं मन मोकळं गाणं या कवितेतून कवयित्री कल्पना दुधाळ मांडत आहेत . 

 *कवितेचा भावार्थ / आशय* :

  कवयित्री कल्पना दुधाळ यांचे जीवन माती , शेतीशी बांधलं गेलंय . बालपणापासून शेतकरी जीवन अनुभवलेल्या या कवयित्री . ' रोज मातीत ' या कवितेत शेतात रावणाऱ्या शेतकरी स्त्रिची वेदना , कष्ट यांचे प्रकटीकरण कवयित्री करतात . कवयित्री म्हणतात सरीमध्ये , वाफ्यामध्ये कांद्यांची लागवड केली जाते . शेतकऱ्याबरोबर शेतकरीणसुद्धा ही लागवड करते . शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्यासोबत लावते . कांद्याची लागवड करून काळ्या मातीवर ती हिरवेपणा गोंदते . पूर्वीच्या स्त्रीच्या अंगावर , कपाळावर गोंदण केलं जायचं . सध्याच्या काळात त्याला टॅटू म्हणून संबोधलं जातं , हे गोंदण हिरवं असतं . कवयित्रीने इथे काळ्या आईला आपल्या कष्टानं सजवलं आहे . पिकांचं हिरवं गोंदण काळया आईवर तिनं चढवलं . आपल्या घरात जशी बाई नांदते . घराचं घरपण कायम ठेवते .
पुढे कवयित्री म्हणते की, शेतात अमाप झेंडूचं फुलांची पीके आली आहे . त्यावरील सोनेरी फुलांनी अवघं शेत सोनेरी झालयं , ती फुलं तोडू नये असं तिला सतत वाटत राहतं . पण फुलांची शेती पैसा मिळवण्यासाठीच तर केलेली असते . फुल तोडताना तिला वाटत राहतं आपण या फुलझाडांचा देहच तोडतोय . हा फुलांचा देह तो तोडण्याचा आपल्याला काय बरं अधिकार आहे . बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो . तिचं मनही तोडल जातं , मनासारख्या सर्वच गोष्टी होत असतात असं नाही . तरी आपल्या घराच्या सुख , समाधानाकरता ती सर्व सहन करते. या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते . दाराला तोरणं बांधते . फुलांच्या सजावटीतून घराला शोभा आणते . आपल्या देहाचंहीं फूल करून घराला सुगंधी , शोभिवंत बाई करत असते . आपल्या घरात शेतात , शेतकरी बाई नांदते , सर्वांना सामावून घेत नांदते ,
                  शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करते . शेतात ऊसाचंही पिक लावलं जातं . ऊस लावताना ऊसाच्या डोळयाच्या अलिकडचा - पलिकडचा ( डाव्या उजव्या) थोडा भाग असतो . ऊसाच्या डोळ्यासकट तो मातीत पुरावा लागतो . त्याला बेणं दाबणं असं म्हटलं जातं . पायाने हे बेणं मातीत दाबावं लागतं . शेतकरी स्त्री हे बेणं मातीत दाबते , त्याच्यासोबत ती तिचं मनही दावते , संसाराचे खाचखळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा , आकांक्षा , स्वप्न बाजूला ठेवाव्या लागतात . आपल्या संसारासाठी सुगरण जशी काड्या काड्या जमवते तसं शेतकरी स्त्रीदेखील आपला संसार काड्या काड्या जमवून सांधते . संसार जोडला तरच तो टिकतो , ते जोडण्याचं , सांधण्याचं काम बाईच करते . या मातीत ती आपला संसार फुलवते .
                शेतातलं काम कष्टाचं काम असतं , पीकासाठी कोळपणी करणं , लावणी , पाणी शेंदणे, कापणी करणं , मळणी करणं या सर्वात बाईला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात . घरातलीही सर्व कष्टाची कामं , शेतातलीही कष्टाची कामं , ही कामं करून आपण थकलोय हे म्हणण्याची तिला सोय नसते . शेतकरी घरातून निघताना वा घरी आल्यावर घरकाम करतोच असं नाही . पण शेतकरी स्त्रीला मात्र आपल्या पोराबाळांसाठी , सासरच्या माणसांसाठी कितीही थकली तरी चूल पेटवावी लागते . या कष्टांमुळे ती रोज मरणप्राय यातना सहन करते . रोज मरावं लागतं ते कष्टामुळे आणि सासरच्या त्रासामुळेही , पण तिला मरून कसं चालेल ? तिला कायम हिरवं रहावं लागतं . संसार उभा करायचा तर थकून चालणार नाही . ती आजारी पडली , थकली तर अवघा संसार ठप्प होईल , म्हणून सहन करत करत संसारमायेपोटी ती आपला उत्साह कमी करत नाही . शेतात लागवड केल्यावर विहिरीतील पाणी शेंदून शेताला पाणी पाजावं लागतं . ते पाणी खोल विहिरीतून शेंदताना प्रचंड जोर लावावा लागतो . हे पाणी शेंदणं , इतर सर्व काम या सर्वात ती नांदत राहते . आपल्या घरासाठी . शेतासाठी तो राब राब राबते .
अशाप्रकारे शेतकरी स्त्री आपला संसार फुलवण्यासाठी मातीत नांदत असते.

Friday, June 26, 2020

व्याकरण व लेखन

                           वाक्यप्रकार 

वाक्य प्रकार व वाक्यरूपांतर अभ्यासणे पूर्वी वाक्य म्हणजे काय हे अगोदर पाहू.
                          वाक्याचा अर्थ:-
                      आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मूूूूूूूूूूलध्वनींना वर्ण म्हणतात. हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतात, ध्वनीच्या या चिन्हांना अक्षरे म्हणतात.ब,द,क, ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला. प्रत्येक वाक्य अशा अर्थपूर्ण शब्दांनी बनलेला आहे. वाक्यात केवळ शब्दांची रचना करून चालत नाही तर ती अर्थपूर्ण शब्दांची रचना असावयास हवी तेव्हाच ते वाक्य होऊ शकते.
                       वाक्या ची व्याख्या :- 

      "अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात ." 
                             किंवा 
       " वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय ." 


                     उदाहरणार्थ :-
              ' बदक पाण्यात पोहते.'
हे एक वाक्य आहे आणि या वाक्यात तीन पदे आहेत वाक्यात वापरलेल्या शब्दाला पोत म्हणतात.
                वाक्य म्हणजे केवळ शब्दांची व्याकरणीक  रचना नव्हे तर आशय आणि अर्थ व्यक्त करणारी रचना होय . वाक्य हे संपूर्णतः मानवी उच्चारण आहे.
          आपण बोलताना, लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो.

 उदाहरणार्थ:-  ‘काल खूप पाऊस पडला’,
                        हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते. 
(१) काल फार पाऊस पडला. (विधानार्थी)
(२) काल काही कमी पाऊस पडला नाही. (विधानार्थी)
(३) काल काय कमी पाऊस पडला का? (प्रश्नार्थी)
(४) काल कमी तर पाऊस पडला नाही ना? (प्रश्नार्थी) 
(५) किती अफाट पाऊस पडला काल! (उद्गारार्थी) 

                             वाक्याचे प्रकार 

 (अ) आशयावरून आणि भावार्थावरून.

 (आ) क्रियापदाच्या रूपावरून.

(अ) वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 
   (१) विधानार्थी 
   (२) प्रश्नार्थी 
   (३) उद्गारार्थी  

असे प्रकार आढळतात. ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. 

(१) विधानार्थी वाक्य- 
                         ज्या"वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला ‘विधानार्थी वाक्य’ असे म्हणतात." 
           विधानार्थी वाक्य हे सर्व काळात व सर्व अर्थात वापरले जाते. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम येतो. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.

                           उदाहरणार्थ:-
  (१) सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. (विधानार्थी)
  (२) विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात               नाही.(विधानार्थी) 
   (३) बाबा पंढरपूरला गेले.
    (४) शरद भरभर चालतो.
   (५) मी इयत्ता बारावीत शिकतो.

वरील वाक्यात विधान केले आहे.
• त्याचबरोबर वाक्यात माहिती दिली आहे.
• तसेच वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे.

(२) प्रश्नार्थी वाक्य-
                          "ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला ‘प्रश्नार्थी वाक्य’ म्हणतात." 
            प्रश्न विचारण्यासाठी सर्व काळाचा व सर्व अर्थाचा वापर केला जातो. ही वाक्य सुद्धा होकारार्थी आणि नकारार्थी असतात. नकारार्थी वाक्य ओळखताना वाक्यातील उणिवा,दोष,अभाव अशा नकारात्मक आशयावरून वाक्य ठरवायची नसतात तर ती क्रियापदाच्या रूपावरून ठरवायचे असतात.

                           उदाहरणार्थ:-
 (१) तू बाहेर केव्हा जाणार आहेस? (प्रश्नार्थी)
(२) तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? (प्रश्नार्थी)
(३) कोण आहे तिकडे?
(४) तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही?
(५) गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये? 
            प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक विशेषणे प्रश्नार्थक क्रियाविशेषणे याचा वापर केला जातो.
• वरील वाक्यात प्रश्न विचारला आहे.
• तसेच माहिती विचारली आहे.
• वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे.



(३) उद्गारार्थी वाक्य-
                            ज्या"वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो, त्या वाक्याला 
‘उद्गारार्थी वाक्य’ असे म्हणतात."
               अशा वाक्यांमध्ये मनातील तीव्र भावना व्यक्त केल्या जाते. व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते तसेच उद्गारार्थी वाक्यात केवलप्रयोगी अव्यय असा वापर केला जातो.

                   उदाहरणार्थ:-
(१)  किती छान आहे हे फूल! (उद्गारार्थी) 
(२) शब्बास ! चांगले उत्तर दिलस!
(३) बापरे! केवढा मोठा साप हा! 
   
  • भावनेचा उद्गार काढलेला आहे
• वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे.


(आ) क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात.

(१) स्वार्थी वाक्य- 
                             "ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला 
‘स्वार्थी’ वाक्य म्हणतात."

                           उदाहरणार्थ:-
   (१) मुले शाळेत गेली. 
   (२) खेळाडू मैदानावर सराव करतात.


(२) आज्ञार्थी वाक्य-
                                "ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश 
आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला ‘आज्ञार्थी’ वाक्य म्हणतात."

                           उदाहरणार्थ:-
  (१) ती खिडकी लावून घे. (आज्ञा) 
 (२) तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. (आशीर्वाद)
 (३) देवा, मला सद्बुद्धी दे. (प्रार्थना)
 (४) कृपया, मला तुझे पुस्तक दे. (विनंती)
 (५) विद्यार्थ्यांनो, खूप मेहनत करा. (उपदेश)
 (६) इथे पादत्राणे ठेवू नयेत. (सूचना)


(३) विध्यर्थी वाक्य- 
                               ज्या"वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, 
इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला ‘विध्यर्थी’ वाक्य म्हणतात."

                           उदाहरणार्थ:- 
(१) परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्य)
(२) आज बहुतेक पाऊस पडेल. (शक्यता)
(३) अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. (योग्यता)
(४) विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा) 


(४) संकेतार्थी वाक्य-  
                          " ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते 
अशी अट किंवा संकेत, असा अर्थनिघत असेल तर त्यास ‘संकेतार्थी’ वाक्य असे म्हणतात."

                            उदाहरणार्थ:- 
 (१) पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला
         असता.
 (२) मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन.











Sunday, June 7, 2020

४) रे थांब जरा आषाढघना

कविता क्रमांक 
                    ४)  रे थांब जरा आषाढघना...
                                  बा.भ. बोरकर_


            निसर्गाचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघांनी क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यांनीच घडवली रंगीबिरंगी जादुई किमिया पाहण्याची इच्छा कवीने व्यक्त केली आहे.
              प्रस्तुत कवितेत कवींनी निसर्गासोबत सुखसंवाद साधण्याची इच्छा या कवितेतून व्यक्त केली आहे. आषाढ महिन्यातील पाउस नुकताच पडून गेला आहे आणि निसर्ग हिरवळीने ओथंबलेला आहे. सगळीकडे हिरवाई च्या नाना छटा दिसून येतात आणि हेच निसर्गसौंदर्य कवीला अनुभवायचा आहे डोळे भरून पाहायचा आहे, या उत्कट इच्छेपाई आकाशातील पाण्याने गच्च भरलेल्या ढगाला आषाढघन या नावाने हाक मारून त्याला थोडा वेळ थांबण्याची विनंती करीत आहे. याच पावसाने मुक्तहस्ताने उधळलेले सौंदर्य मला डोळे भरून पाहू दे अशी इच्छा कवी आषाढघना कडे व्यक्त करतो.
            शेतातल्या पिकाबद्दल कवी बोलताना सांगतात की, भूईतून वर आलेली रोपे पाचू  ( हिरव्या रंगाची रत्न) प्रमाणे दिसतात हेच हिरव्या रंगाची रोपे कवीला आपल्या डोळ्यांनी पाहायचे आहे ही शेतातली माती कणीदार लालसर आहे व त्यावर नांगरणी चालू आहे शेतकरी मशागत करत आहे .निळ्या रंगाचे रत्न म्हणजेच बांबूच्या बेटांना कवी (निळ्या रंगाची रत्न)अशी उपमा देतो आणि हे सगळ निसर्गाचे जे रूप आहेत या तुझ्याच पाऊल खुणा आहेत हे मला पाहायचे आहेत म्हणून कवी आषाढ घनाला विनंती करतो की थोडावेळ थांब.
              त्याचबरोबर केवढ्याची पानं म्हणजेच केतकीला सुद्धा आनंद झाला आहे आणि ती आनंदाने रोमांचित झाली आहे, सोनचाफा ही फुलून आला आहे आणि जाईच्या या नाजूक कळ्या त्या म्हणजे जणू त्याच्या लेकीच. जणू नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या अल्लड युवतीच. त्याही पुन्हा पुन्हा लाजून पाहत आहेत आणि  हे सगळं  कवीलाही पाहायचा आहे त्यासाठी पाऊस थांबायला पाहिजे अशी विनंती कवी करतो.
               हे घना थोडा वेळ विश्रांती घे आणि वासरमणि  म्हणजेच सूर्याच्या घराचे दार उघड आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेल्या या जादूई सौंदर्यावर हळदीचे कोवळे ऊन
अलगत वाहु दे. त्यासाठी हे आषाढघन तू थोडा वेळ उघडीप घे.
              पोस्टीक दुधाने कणसे भरून जाऊदे आणि फुलांचे देठ हे हलके मधानी भरावे हे सर्व पाहून पक्षी मधुर गाणे गाऊ लागतात तेव्हा गवताच्या पात्यावर उठलेला आनंदाचा शहारा कवीला जाणवतो आहे.
          अश्लेशा नक्षत्रामध्ये श्रावण महिना येतो व या महिन्यात पडतो रिमझिम पाऊस पडतो या पाऊस आला कवी तुषारस्नान असं म्हणतो या तुषारस्नानात उडत असलेली फुलपाखरे मध्यान्हा च्या वेळी कवीला तेजस्वी रत्ने उडत असल्याचा भास होतो इंद्रवर्णात-( इंद्रधनुष्याचा) सप्तरंगात न्हाऊन निघालेली रंगीबिरंगी फुलपाखरे कवीला पाहावयाचे आहे. त्यासाठी आषाढी घणांनी थांबावे असे कवीला वाटते.
         आता अंधार पसरला आहे रात्र झाली अशा या शांत वातावरणात चमचमणाऱ्या काजव्यांचे प्रकाश फुले आणि पाण्यात पडणाऱ्या चंद्रबिंबाशी संवाद साधायचा आहे.... त्यासाठी मेघांनी क्षणभर विश्रांती घ्यावी अशी विनंती कवी करतो.


 कवितेतील शब्दार्थ : 

१ ) धन - ढग , २ ) दिठी - दृष्टी , ३ ) *करूणा* - दया , ४ ) *कोमल* - नाजुक , ५ ) *पाचू* - हिरव्या रंगाचे रत्न , ६ ) *प्रवाळ* – पोंवळे , ७ ) *औत* - नांगर , ८ ) *इंद्रनीळ* - निळ्या रंगाचे एक रल , ९ ) *वेळूची* बेटे - बांबुचे बन , १० ) *पदविन्यासखुणा* - पाऊलखुणा , ११ ) *रोमांचित* – अतिशय आनंदाने अंगावर उठणारा काटा , १२ ) *गंध* - सुवास , १३ ) *केतकी* - केवडा , १४ ) *फुटे फुली* - फुलून येणे , १५ ) *सोनपंचक* - सोनचाफा , १६ ) *जाईच्या लेकी* - जाईची फले . १७ ) *गगन* - आकाश . १८ ) *घडिभर* - थोडावेळ , १९ ) *आसर* – पावसाळ्यातील उघडीप , २० ) *खुले करणे* – उघडणे , २१ ) *वासरमणि* - सूर्य , २२ ) *किमया* – जादू , २३ ) *हळदुव्या उन्हा –* हळदीच्या रंगासारखे ऊन , २४ ) *जिवस* – पौष्टिक , २५ ) *अरळ* - अलवार , मृदु , हलके , २६ ) *कंठ* – गळा , २७ ) *खग* - पक्षी , २८ ) *मधुगान* - मधूर गायन , २९ ) *शहारा* - रोमांच , ३० ) *तृणपर्ण* – गवताचे पाते , ३१ ) *आश्लेषा* – २७ नक्षत्रांपैकी एक , ३२ ) *तुषार* - पाण्याचे उडणारे थेंब , ३३ ) *रत्नकळा* – रत्नांची तेजस्वी छटा , ३४ ) *माध्यान्ह* – दुपारची वेळ , ३५ ) *इंद्रवर्ण* – इंद्रधनुष्याचे सात रंग , ३६ ) *वन* – जंगल , ३७ ) *काळोख* – अंधार , ३८ ) *आसवे* – अश्रू , ३९ ) *पालवणे* - प्रकाशमान होणे , ४० ) *हितगुज* - सुखसंवाद , ४१ ) *निरखीत* – निरीक्षण करीत , ४२ ) *जळ* – पाणी , ४३ ) *विधुवदना* – चंद्रबिंब